कुंभमेळ्यापूर्वी कामे पूर्ण करा, अन्यथा वाहतूक कोंडीचा स्फोट अटळ – आ. आशुतोष काळे यांचा रोखठोक इशारा

कुंभमेळ्यापूर्वी कामे पूर्ण करा, अन्यथा वाहतूक कोंडीचा स्फोट अटळ – आ. आशुतोष काळे यांचा रोखठोक इशारा

Complete Works Before the Kumbh Mela; Otherwise, a Traffic Gridlock Crisis is Inevitable – MLA Ashutosh Kale’s Blunt Warning

गडकरींशी थेट भेट; कोपरगावच्या रस्त्यांचा ‘इशारा’ दिला!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 22Sun.20.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीचा गंभीर मुद्दा थेट दिल्ली दरबारात नेऊन आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि कोपरगाव मतदारसंघातील प्रलंबित रस्ते कामे तातडीने पूर्ण करण्याची जोरदार मागणी केली.

नगर–मनमाड महामार्ग, नागपूर–मुंबई समृद्धी महामार्ग आणि गुजरातकडून येणाऱ्या प्रमुख मार्गांच्या संगमावर कोपरगाव हे ‘हॉटस्पॉट’ ठरत असताना, सध्याची अपुरी आणि विस्कळीत रस्ते व्यवस्था कुंभमेळ्यात कोलमडण्याची भीती काळे यांनी स्पष्ट शब्दांत मांडली. “भाविकांचा लोंढा आणि रस्त्यांची दुरवस्था, ही धोकादायक संगमरेषा आहे,” सावळी वर येथील पूल झगडे फाटा येथील पूल संवत्सर येथील पूल अशा महत्त्वाची कामे अपुऱ्या असल्याचे सांगत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले.

“आजच उपाययोजना केल्या नाहीत, तर उद्या लाखो भाविक रस्त्यावर अडकतील आणि स्थानिकांचे जगणेही मुश्कील होईल,” असा थेट इशारा देत काळे यांनी प्रशासनाच्या ढिलाईवर बोट ठेवले. केवळ कागदी आश्वासने नकोत, तर प्रत्यक्षात रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती आणि पर्यायी मार्गांची उभारणी तातडीने सुरू करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी गडकरी यांच्यासमोर मांडली.
कोपरगाव हे केवळ मार्ग नसून कुंभमेळ्यासाठी ‘ट्रान्झिट हब’ बनत असल्याचे अधोरेखित करत, “येथील वाहतूक व्यवस्था कोलमडली, तर संपूर्ण कुंभमेळ्याच्या नियोजनावर परिणाम होईल,” असा इशारा काळे यांनी दिला. भाविकांची गैरसोय आणि स्थानिकांचा संताप टाळायचा असेल, तर तत्काळ निर्णय घेणे अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकूणच, कुंभमेळ्याच्या तोंडावर कोपरगावातील रस्त्यांचा प्रश्न ‘रेड अलर्ट’वर पोहोचला असून, आता कृती झाली नाही तर वाहतूक कोंडीचे भीषण चित्र अटळ असल्याचे वास्तव काळे यांनी केंद्र सरकारसमोर ठणकावून सांगितले आहे.

चौकट 
दक्षिणवाहिनी गोदावरीमुळे कोपरगाव ‘कुंभस्नानाचे उपकेंद्र’; ताण दुप्पट!
भाविकांची वाढती गर्दी, अपुरी व्यवस्था; रस्ते व दळणवळणावर अभूतपूर्व दबाव – परिस्थिती गंभीर
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावचे महत्त्व केवळ मार्गापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर येथे असलेल्या दक्षिणवाहिनी गोदावरीमुळे हे ठिकाण भाविकांसाठी ‘स्नानस्थळ’ म्हणूनही वेगाने पुढे येत आहे. परिणामी, कोपरगावमध्ये थांबून पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, यामुळे रस्ते, वाहतूक आणि स्थानिक व्यवस्थेवर दुप्पट ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिककडे जाणाऱ्या भाविकांसाठी कोपरगाव हा नैसर्गिक थांबा ठरत असताना, दक्षिणवाहिनी गोदावरीत स्नान करण्यासाठीही हजारो भाविक येथे गर्दी करतात. “मार्ग आणि स्नानस्थळ – या दुहेरी भूमिकेमुळे कोपरगावची परिस्थिती अधिकच गंभीर बनणार आहे,” असे स्पष्ट वास्तव समोर येत आहे.
आधीच अपुरी रस्ते व्यवस्था, पार्किंगची कमतरता आणि वाहतूक नियंत्रणातील त्रुटी या पार्श्वभूमीवर भाविकांचा ओघ वाढला, तर शहरात वाहतूक कोंडी, गोंधळ आणि गैरसोयींचे चित्र निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेषतः घाट परिसर, मुख्य रस्ते आणि शहरातील प्रवेशद्वारांवर प्रचंड दबाव निर्माण होणार असल्याने, तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, “कुंभस्नानाचा आध्यात्मिक अनुभव वाहतूक कोंडीच्या त्रासात हरवेल,” अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
एकूणच, दक्षिणवाहिनी गोदावरीमुळे कोपरगावचे वाढलेले धार्मिक महत्त्व ही संधी असली, तरी नियोजनाच्या अभावामुळे तेच मोठे संकट ठरू शकते. त्यामुळे प्रशासनाने वेळ न दवडता ठोस पावले उचलणे हीच काळाची गरज ठरत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page