दादा, केंद्रातून देशातील गुरवांसाठी आर्थिक पॅकेज आणा ; शिळया कढीला ऊत कशाला, – ॲड. शिंदे

दादा, केंद्रातून देशातील गुरवांसाठी आर्थिक पॅकेज आणा ; शिळया कढीला ऊत कशाला, – ॲड. शिंदे

मग जल्लोष केवळ पोकळ घोषणेचा करायचा का ?

                   संत काशिबा महाराज

वृत्तवेध ऑनलाईन 22 July  2020

By : Rajendra Salkar

कोपरगाव : चंद्रकांतदादा पाटील तुम्ही आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहांत, जर खऱ्या अर्थाने तुम्हाला गुरव समाजाबद्दल कळवळा असेल, तर केंद्रात भाजपची सत्ता आहे तेंव्हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील संपूर्ण गुरव पुजारी व मंदिरासाठी पॅकेज मंजूर करून आणा, असे आवाहन अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे.

ॲड शिंदे म्हणाले, समाजाला थेट आर्थिक मदत करावी, तसेच मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे या मागण्या दोन महिन्यापूर्वी एका निवेदनाद्वारे आम्हीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. या मागण्यांचा पुनरुच्चार हे चंद्रकांत पाटलांचे सोयीचे राजकारण असून
यातून फक्त शिळया कढीला ऊत आणला जात असल्याचा आरोप त्यांनी  केला.

आता केवळ पत्र दिले, थेट आर्थिक मदत , किंवा मंदिरांसाठीचे आर्थिक पॅकेज दिले नाही. या मागण्या तर सरकारच्या पटलावरही नाहीत, चंद्रकात पाटील वेगळे सांगत आहेत, तर मुख्यमंत्री वेगळेच सांगत आहेत. मग जल्लोष कशाचा करायचा ? केवळ पोकळ घोषणेचा करायचा का ?असा सवाल ॲड  शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

ॲड शिंदे म्हणाले, मे २०१५ मध्ये आझाद मैदानावर धारणे आंदोलन व ३० मार्च २०१७ रोजी आझाद मैदानावर मोर्चा व ऑक्टोबर २०१७ मध्ये सर्व जिल्हा कार्यालय व मंत्रालय या ठिकाणी समाजामार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.त्यावेळी भाजपाची सत्ता असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सहा वेळेस भेटलो, निवेदन दिले

नागपूर येथील गुरव समाजाचा वधू-वर मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देतांना गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट आण्णासाहेब शिंदे

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी गुरव समाजाच्या मागण्यांची साधी दखलही घेतली नाही, तेच चंद्रकांत पाटील आज एकदम गुरव समाजाच्या मागणीचे पत्र देतात हे जरा अनाकलनीय असून त्यांची हि दुटप्पी भूमिका लक्षात येते. अशी खोचक टीका त्यांनी केली.

ॲड.शिंदे म्हणाले, सरकारमध्ये असताना माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटिलांनी गुरव समाजाने केलेल्या मागण्यांचे काय झाले ? याबाबत खुलासा केला तर बरे होईल.
पक्ष कोणताही असो, सरकारमध्ये राहून काम करायचे नाही, आणि सत्तेतून पायउतार होताच समाज कोणताही असो, मग त्या समाजातील काही लोकांना  हाताशी धरून समाजाबद्दल आपुलकी दाखवतात. हे केवळ आपली राजकीय पोळी भाजण्याचा फंडा आहे. सत्ताधारी पक्षावर कुरघोडी करण्याचे राजकारण असल्याचे टीका ॲड. शिंदे यांनी केली.

एवढ्या तेवढ्याचा जल्लोष करू नका, हुरळून जाऊ नका, कारण गुरव समाजाची ताकत दाखविल्याशिवाय तुमच्या कोणत्याच मागण्या मान्य होणार नाहीत. हे सत्य लक्षात ठेवा, एक व्हा, वज्रमूठ बांधा, असे आवाहन ॲड. शिंदे यांनी शेवटी   केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page