ऐन सणासुदीत पाणी योजना व पथदिव्यांवर संक्रात -स्नेहलता कोल्हे.
Sankrat-Snehalta kolhe on water scheme and street lights during Ain festival.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu19 Oct 2021,16:20Pm.
कोपरगांव : कोपरगांव विधानसभा मतदार संघातील विविध ग्रामपंचायतींच्या पिण्यांच्या पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांचा वीज प्रवाह वीज वितरण कंपनीने कुठलीही पुर्वसुचना न देता खंडीत केल्याने या पाणी योजना व पथदिव्यांवर संक्रात आली असुन ऐन सणासुदीत काळी दिवाळी साजरी करण्यांची पाळी आली आहे तेव्हा हा वीजपुरवठा तातडीने पुर्ववत करावा या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे.
सौ. स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, यापूर्वी गावातील पथदिव्यांचे विज बिलाची १०० टक्के रक्कम राज्य सरकार भरत होते तसेच पाणी पुरवठा योजनाचे विज बिलाची रक्कम ग्रामपंचायतीने १०० टक्के भरल्यावर व सदरचे विज बिल जिल्हा परिषदेकडे सादर केल्यानंतर जिल्हा परिषद सदर विज बिलाची ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीस परत अदा करीत होते.
कोरोना परिस्थितीत ग्रामपंचायतीस वसुल झालेला नसल्याने विज बिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायत असमर्थ आहे, परंतू महाराष्ट्र विज वितरण कंपनीने विज पुरवठा खंडीत केल्यामुळे गावातील नागरिकांचा व जनावरांचा पिण्याचे पाण्याचा गंभीर प्रश्न ग्रामपंचायतीपुढे निर्माण झालेला आहे. त्यातच दिपावली सारखा मोठा सण येत असल्याने महिला भगिनींची मोठी तारांबळ उडालेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. विजपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायात सरपंच, उपसरपंच व सदस्य आणि गावातील नागरिक अंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
तेंव्हा शासनाने विशेष लक्ष घालुन विज पुरवठा सुरळीत करावा., या निवेदनाच्या प्रती उर्जामंत्री नितीन राउत, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वीज वितरण कंपनीचे नाशिकचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता अहमदनगर व कार्यकारी अभियंता संगमनेर यांना देण्यांत आल्या आहेत.





