वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजना प्रश्न सोडविणार – आ. आशुतोष काळे

वारी-कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजना प्रश्न सोडविणार – आ. आशुतोष काळे

Wari-Kanhegaon joint water supply scheme will solve the problem – Mla. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon22 Nov.2021 18.30Pm.

कोपरगाव : काही वर्षापासून प्रलंबित असलेला वारी- कान्हेगाव संयुक्त पाणी पुरवठा योजनेचा वर्षानुवर्षांचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी वारी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली. यावेळी त्यांच्या हस्ते ३ कोटी ३० लाख रुपयांच्या कामाची सुरुवात करण्यात आली .

आ. आशुतोष काळे म्हणाले की, पिण्याचे, शेतीचे पाणी,रस्ते, वीजेचे प्रश्न, तीर्थक्षेत्र विकास व मुलभूत गरजांना प्राधान्य दिले आहे. रस्ते, पूल आणि पाणी पुरवठा योजनेसाठी मंजुरी मिळवण्यात फार मोठा फरक आहे. पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवितांना अनेक बाबी तपासल्या जातात. यामध्ये पाणी पुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे का? ग्रामपंचायतीची स्वमालकीची जागा आहे का? पाण्याचा स्त्रोत आदी गोष्टी महत्वाच्या आहेत. तरीदेखील माता, भगिनींची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी या पंचवार्षिक मध्येच ही योजना पूर्ण करण्याचा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर माजी आमदार अशोकराव काळे त्याच्याकडून वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पूर्ण व्हावा हि अपेक्षा होती. त्यांनी या पुलाबाबत प्रस्ताव देखील मंजुरीसाठी पाठविले. परंतु दुर्दैवाने २०१४ ला सत्ता बदल झाल्यामुळे पुढील कार्यवाही झाली नाही. परंतु हा पूल देखील आपण पूर्ण करणार असून वारी-कान्हेगाव हा रस्ता, कोळ नदीवरील पुल, २५१५ योजनेतून वारीच्या मुख्य बाजारपेठेच्या रस्ता, . एमडीआर २०३ या रस्त्यासाठी देखील निधी उपलब्ध होवून वारीचा दळणवळणाच्या अडचणी दूर होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधनेउपसभापती अर्जुनराव काळेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोमसंचालक बाळासाहेब बारहातेपंचायत समिती सदस्य मधुकर टेकेजिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदारदिलीप बोरनारेदिलीप आबकबबनराव सांगळेलक्ष्मणराव चौधरीनामदेवराव जाधवसरपंच सतिश काकडेउपसरपंच विशाल गोर्डेनानासाहेब टेकेदेवचंद कडेकररंगनाथ काजळेरमेश काळेबंकटराव जगतापताराचंद सत्राळकरशरद जोशीअशोक निळे राजेंद्र गायकवाडअशोकराव कानडेगोरक्षनाथ टेकेरमेश कोकाटेदत्तात्रय शिरसाठबाबूशेठ कलंत्रीभास्करराव आदमानेसंदीप जाधवरमेश टेकेदिलीप देशमुखदिलीप गायकवाडरावसाहेब टेकेसचिन टेकेअशोक टेकेविजय गायकवाडसंजय जाधववाल्मीक काजळेजनार्दन जगताप,  नवनाथ जाधव, प्रमोद सांगळेबापू कडेकरअनिल काजळेप्रकाश चौधरीदिनकर काजळेदिपक भाकरेकडूबा खिलारीगणेश गुंजाळमहेश भोकरेविवेक टेकेगोपाल कारवासुखदेव मुसळेराजेंद्र पांडेगोरखज लांडगेप्रकाश गोर्डेमदनशेठ काबरापाळंदे सरगोकुळ मेहेरकॉन्ट्रॅक्टर सोमनाथ गीतेयेवलेसार्वजनिक बांधकाम  विभागाचे चौधरी,  उपअभियंता उत्तम पवार,  ग्रामसेवक वारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट :- पुलासाठी कुणी तरी निवेदन दिल्याचे ऐकायला मिळाले. मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना निवेदन द्यायची होती आणि पुलासाठी निधी देखील आणायचा होता. मात्र त्यावेळी निवेदन दिली नाही आणि निधी देखील आणला नाही. आता मात्र सत्ता गेल्यावर त्यांना शहाणपण सुचत असून आपण करणाऱ्या कामाबाबत निवेदन द्यायचे काम सध्या जोरात सुरु आहे – आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

You cannot copy content of this page